अटकपूर्व जामीन म्हणजे काय ?
या लेखामध्ये आपण माहिती बघून अटकपूर्व जामीन म्हणजे काय ? अटकपूर्व जामीन का व कधी घेतला जातो? तो कसा मिळतो तो ? कोणत्या गुन्ह्यात मिळतो, त्यासाठी काय काय आवश्यक कागदपत्रे लागतात ? अटकपूर्व जामीन मिळविण्याची प्रक्रिया काय असते या बाबत माहिती बघू.
आपल्या भारत देशामध्ये अटकपूर्व जामीनाची तरतूद Criminal Procedure Code (CrPC) Section 438 / नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNNS) चे कलम 482 यामध्ये करण्यात आली आहे. या कलमानुसार सत्र न्यायालयात किंवा उच्च न्यायालयत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करावा लागतो या कोर्टातून आरोपीला अटकपूर्व जामीन मिळू शकतो.
भारतीय कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला Right to Personal Liberty आणि Fundamental Rights मिळालेले आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर फक्त आरोप झाला म्हणून त्याला विनाकारण तुरुंगात ठेवणे योग्य नाही. म्हणूनच Criminal Law मध्ये अटकपूर्व जामीनाची तरतूद करण्यात आली आहे.
जामीन म्हणजे काय?
जामीन म्हणजे न्यायालयाने आरोपीला तात्पुरत्या स्वरूपात दिलेले स्वातंत्र्य होय. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो तेव्हा त्या व्यक्तीला अटक होऊ शकते. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार काही अटींच्या अधीन राहून आरोपीला बाहेर राहण्याची परवानगी दिली जाते. यालाच Bail in Criminal Case असे म्हणतात.
अटकपूर्व जामीन म्हणजे काय?
अटकपूर्व जामीन म्हणजे एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की पोलीस त्याला Non-Bailable Offence मध्ये अटक करू शकतात, तर तो व्यक्ती अटक होण्यापूर्वीच न्यायालयाकडे जामीन मिळविण्यासाठी अर्ज करू शकतो. न्यायालयाने हा Anticipatory Bail मंजूर केल्यास पोलिसांनी अटक केली तरी त्या व्यक्तीला लगेच जामीनावर सोडावे लागते.
एखाद्या व्यक्तीच्या हातून गुन्हा घडला किंवा गुन्हा घडल्याचा संशय निर्माण झाला तर पोलीस त्या व्यक्तीला आरोपी म्हणून अटक करू शकतात. अटक झाल्यानंतर आरोपीला जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागतो. परंतु काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की एखाद्या व्यक्तीला आधीच माहिती असते की पोलिसांकडून त्याला अटक होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कायद्याने त्या व्यक्तीला अटक होण्यापूर्वीच न्यायालयाकडून जामीन मिळविण्याची सुविधा दिली आहे. यालाच अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) असे म्हणतात.
जामीनाचा उद्देश आरोपीला कायमस्वरूपी मुक्त करणे नसतो, तर त्याला न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तात्पुरते स्वातंत्र्य देणे हा असतो. त्यामुळे आरोपीला न्यायालयात वेळोवेळी हजर राहणे आवश्यक असते.
अटकपूर्व जामीन का घेतला जातो?
कधी कधी एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप लावले जातात किंवा एखाद्या वादातून गुन्हा दाखल केला जातो. अशा परिस्थितीत आरोपीला अटक होण्याची शक्यता असते. अटक झाल्यास त्याची सामाजिक प्रतिष्ठा, नोकरी, व्यवसाय आणि कुटुंब यावर परिणाम होऊ शकतो.
एखाद्याला व्यक्तीला वाटत असेल की त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले जाण्याची शक्यता आहे तर तो व्यक्ती अटक होण्यापूर्वीच न्यायालयात अर्ज करून Anticipatory Bail Application दाखल करते. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यास पोलीस अटक करू शकतात, पण त्या व्यक्तीला ताब्यात ठेवू शकत नाहीत.
अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी काही महत्त्वाचे कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत.
FIR Copy गुन्हा दाखल झाल्याची प्रत
ओळखपत्र आधार कार्ड / पॅन कार्ड
पत्ता पुरावा वीज बिल / रेशन कार्ड
वकिलामार्फत अर्ज Anticipatory Bail Application
इतर पुरावे आरोपीचा बचाव दर्शविणारे कागदपत्र.
अटकपूर्व जामीन मिळविण्याची प्रक्रिया काय असते.
अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी आरोपीने प्रथम अनुभवी वकिलाशी संपर्क साधणे आवश्यक असते. वकील आरोपीच्या प्रकरणाचा अभ्यास करून न्यायालयात Anticipatory Bail Petition दाखल करतात.फौजदारी कायद्याच्या वकिलांचा शोध घेणे
यानंतर न्यायालय सरकारी वकिलाचा युक्तिवाद ऐकते आणि प्रकरणाची गंभीरता पाहते. जर न्यायालयाला असे वाटले की आरोपीला अटक करणे आवश्यक नाही, तर न्यायालय काही अटींसह जामीन मंजूर करते.
अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर कोणत्या अटी लागू होतात?
अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालय आरोपीवर काही अटी घालू शकते.
आज आम्ही देताना काही अटी व शर्ती लावल्या जातात त्या पुढील प्रमाणे.
तपासात सहकार्य पोलिस तपासात सहकार्य करणे
पुरावे नष्ट न करणे कोणतेही पुरावे नष्ट न करणे
साक्षीदारांवर दबाव नाही साक्षीदारांना धमकी देऊ नये
न्यायालयात हजर राहणे आवश्यकतेनुसार कोर्टात उपस्थित राहणे.
अटकपूर्व जामीन नाकारला जाऊ शकतो का?
होय, काही गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालय अटकपूर्व जामीन नाकारू शकते. विशेषतः Serious Criminal Offence, Economic Offence, Organized Crime यांसारख्या गुन्ह्यांमध्ये न्यायालय जामीन देताना खूप काळजी घेते.
अटकपूर्व जामीनाचे फायदे
अटकपूर्व जामीनामुळे आरोपीला अटक होण्यापासून संरक्षण मिळते. यामुळे त्याची सामाजिक प्रतिष्ठा टिकून राहते. तसेच आरोपीला स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. अनेक वेळा खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना अटकपूर्व जामीनामुळे मोठा दिलासा मिळतो.न्यायालयीन आणि कायदेशीर सल्ला घेणे
थोडक्यात म्हणजे :-
अटकपूर्व जामीन ही भारतीय कायद्यातील एक महत्वाची तरतूद आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीला अटक होण्यापूर्वीच न्यायालयाकडून संरक्षण मिळते. मात्र हा जामीन सर्व प्रकरणांमध्ये मिळतोच असे नाही. न्यायालयाद्वारे गुन्ह्याचे स्वरूप, पुरावे आणि परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात.

