![]() |
मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत मोटर अपघात दावा न्यायाधिकरण या बाबत.
रस्ते अपघातात व्यक्ती जखमी अथवा मृत झाल्यास (MACT) Motor Accident Claim Tribunal या न्यायाधिकरनात म्हणजेच कोर्टात नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल करून नुकसान भरपाई मिळवता येते.
आता रस्त्यावर वाहनांची संख्या खूप वाढलेली आहे. त्यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण देखील वाढलेले आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी शासनाने देखील आता बर्याच सुधारणा केलेल्या आहेत जसे रस्ते रुंदीकरन, फ्लायओवर, ब्रिजेस, आशा अनेक सुधारणा देखील होत आहेत. परंतु तरी देखील काही रस्ते अपघात हे होतच असतात. कारण काही लोक वाहतुकीचे नियम पाळत नाही. त्यानंतर अपघात होण्याचे मुख्य कारण हे देखील आहे की खूप जास्त वेगात वाहन चालवणे. रस्ते अपघात कमी व्हावे यासाठी मोटर वाहन कायद्यात देखील सुधारणा करून दांडाची रक्कम (Fine) व शिक्षा देखील वाढलेली आहे.
अपघात होण्याचे अजून हे देखील एक कारण आहे की, आपल्या देशात पालक हे आपल्या लहान अल्पवयीन मुलांना बेजबाबदारपणे वाहाण देत असतात त्यामुळे देखील अपघात होतात. आपल्या देशात आपण Hit and Run च्या देखील बर्याच केसेस बघितलेल्या आहेत. त्यामुळे मोटर वाहन कायदा यात सुधारणा करून दंडाची रक्कम वाढवण्यात आली व शिक्षा देखील सक्त करून वाढवण्यात आली आहे. त्यानुसार कोणी जर अपघात केला आणि मदत न करता पळून गेला तर त्यासाठी 10 वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात आली होती परंतु ट्रक ड्रायवर व वाहतूक दार यांनी त्याचा विरोध करून व संप केल्याने त्यास तूर्तास्थ स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे सुरक्षित वाहन चालवावे व वाहतुकीचे नियम पळून वाहन चालवणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण व आपला परिवार तसेच इतर नागरिक देखील सुरक्षित राहतात.
रस्ते अपघातात बरेच लोक हे जखमी होतात व बरेच लोक हे आपला जीव गमवता. तसेच बरेच तरुण लोक देखील अपघातात आपला जीव गमावतात. त्यामुळे रस्ते अपघातात कोणी जखमी झाले किवी मृत झाले तर त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट येत असते. घरातील जर कर्ता व्यक्ती अपघातात जखमी किवा मयत झाला तर त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणीचा सुद्धा सामना करावा लागतो. त्यांचे दुख: हे कधीही भरून न येणारे तर असते.
आपल्या देशातील मोटर वाहन कायद्या नुसार जखमी किवा मृत याचे कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळू शकते. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच त्यांच्या कुटुंबीयांना होऊ शकतो. तसेच जखमी व्यक्तिला देखील त्याचा रुग्णालयात झालेला खर्च व नुकसानभरपाई मिळवता येते.
बर्याच लोकांना याची माहिती नसते त्यामुळे त्यांना MACP (Motor Accident Claim Petition) दाखल करण्यास अडचणी येऊ शकतात किवा असे देखील होत असते की ते क्लेम दाखालच करत नाहीत. आपले केस मधील वकील असतील तर ते तुम्हाला सर्व माहिती देऊन मदत करतीलच.
आता आपण माहिती बघू MACT (Motor Accident Claim Tribunal) येथील MACP (Motor Accident Claim Petition) ची प्रक्रिया कशी असते.
जखमी अथवा मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी मोटर अपघात न्याय प्राधिकरण या विशेष न्यायालयची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर न्याय प्राधिकरण हे जिल्ह्याच्या ठिकाणी असते.
नुकसान भरपाई क्लेम बाबत सर्व प्रक्रिया तसेच मोटार वाहने व त्यापासून होणारे अपघात या विषयी सर्व तरतुदी या मोटार वाहन कायदा, 1988 यानुसार होते.
अपघात झाल्या नंतर सर्वात आधी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जे जखमी आहेत त्यांना मदत करणे. त्यांना प्रथम उपचार मिळणे. त्यासाठी त्यांना मदत करून Ambulance ला कॉल करणे अथवा जास्त वेळ होत असेल तर खाजगी वाहनाने जखमी यांना जास्त वेळ न करता रुग्णालयात दाखल करणे आणि पोलिसांना कॉल करणे महत्वाचे असते.
अपघात झाल्यावर पळून न जाता जखमी यांना मदत करणे गरजेचे आहे. लोकांनी देखील अपघात झाल्यावर वाहन चालक याला मारहाण न करता पोलिसांना बोलवावे. चालक पळून गेल्यास वाहनाच्या नंबर ची नोंद प्रथम दर्शनी उपस्थित असलेल्या लोकांनी करून ठेवली पाहिजेल.
वाहन नोंदणी व मालका विषयी माहिती ऑनलाइन.
![]() |
Click Above To See Blog Post |
त्यानंतर पोलिसात FIR दाखल केला जातो. FIR यात घटनेची माहिती असते जसे अपघात कधी, कोठे व कसा झाला. अपघातास कोण करणीभूत आहे वगैरे. FIR हा महत्वाचा आहे त्यामुळे तो निट लिहिला जाने महत्वाचे आहे. बर्याच वेळा FIR हा अज्ञात वाहनाच्या विरुद्ध लिहिला जात असतो.
रुग्णास रुग्णालयात दाखल केल्यावर अपघाताची केस ही मेडिको लीगल केस असते त्यामुळे डॉक्टर यांना देखील अपघातच्या केस ची माहिती पोलिसांना द्यावी लागते. त्या वेळी सुद्धा FIR दाखल होऊ शकतो.
FIR दाखल झाल्यानंनातर पोलिस हे घटना स्थळी दाखल होतात. जर जखमी यांना मदत मिळालेली नसेल तर पोलिस आधी मदत करतात. त्यांनातर चौकशी सुरू करतात. घटना स्थळाचा पंचनामा करतात. प्रत्यक्षदर्शी यांचे जाब जबाबा घेतात. अपघातास कोणाची चुकी होती व अपघात कसा झाला याची चौकशी करतात. आरोपी किवा ज्याच्या चुकी मुळे अपघात झालेला असेल त्याचा शोद घेऊन त्याला ताब्यात घेतात व चौकशी करतात. त्याची मेडिकल तपासणी पोलिस करू शकतात कारण ड्रिंक अँड ड्राइव ची पण केस असू शकते. अपघातास कारणीभूत ठरलेल्या गाडी चे कागदपत्रे, विमा याची चौकशी होते. आणि परिस्थिती व घडलेली घटना या नुसार ड्रायवर वर गुन्हा दाखल होऊन विविध कलमे दाखल केले जातात.
त्यानंनातर पोलिस हे तपास पूर्ण झाला की DAR रीपोर्ट म्हजेच Detail Accident Report तयार करतात व यालाच पोलिस चलन असे देखील म्हटले जाते व ते कोर्टात सादर केले जात असते.
पोलिस तपास व DAR रीपोर्ट म्हजेच Detail Accident Report याचे सर्व कागदपत्रे याचे प्रमाणित नाकाला काढून घ्याव्यात लागतात कारण आपल्याला क्लेम Petition तयार करणे साठी व claim दाखल करते वेळे लागत असतात.
आता मोटर अपघात दावा न्यायाधिकरण / (MACT) Motor Accident Claim Tribunal येथ जखमी किवा मृत यांचे नातेवाईक यांना क्लेम पिटीशन दाखल करावे लागेल.
FIR केस व क्लेम पिटिशन केस दाखल झाली की दोघे केस Parallel चालत असतात.
सदर क्लेम पिटीशन दाखल करण्या साठी अधिकार क्षेत्र तीन प्रकारे आहेत. (1) ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे तेथील कोर्ट. (2) जिथे अपघातातील जखमी किवा मृत व्यक्ती किवा त्याचे कुटुंबीय राहतात ते ठिकाण. आणि (3) जिथे ड्रायवर किवा गाडीचा मालक राहत असेल ते ठिकाण. या ठिकाणी क्लेम दाखल करता येतो. परंतु जेथे अपघात झालेला आहे तेथे पण क्लेम दाखल करू शकतो.
क्लेम दाखल करताना पार्टी (1) ड्रायवर ज्या मुळे अपघात झालेला आहे तो, (2) त्या वाहनाचा मालक, (3) त्या वाहनाची विमा कंपनी यांना पार्टी करावे लागते.
सदर अर्ज हा Motar Vehicle Act चे कलम 166 नुसार दाखल करावा लागतो. अपघाता मध्ये जखमी किंवा मृत व्यक्तीला नुकसान भारपाइ मिळणे बाबत तरतुद ही या वरिल कलमा नुसार आहे.
(1) An application for compensation arising out of an accident of the nature specified in sub-section (1) of section 165 may be made--
(a) by the person who has sustained the injury; or
(b) by the owner of the property; or
(c) where death has resulted from the accident, by all or any of the legal representatives of the deceased; or
(d) by any agent duly authorised by the person injured or all or any of the legal representatives of the deceased, as the case may be:
Provided that where all the legal representatives of the deceased have not joined in any such application for compensation, the application shall be made on behalf of or for the benefit of all the legal representatives of the deceased and the legal representatives who have not so joined, shall be impleaded as respondents to the application.
1[Provided further that where a person accepts compensation under section 164 in accordance with the procedure provided under section 149, his claims petition before the Claims Tribunal shall lapse.]
2[(2) Every application under sub-section (1) shall be made, at the option of the claimant, either to the Claims Tribunal having jurisdiction over the area in which the accident occurred or to the Claims Tribunal within the local limits of whose jurisdiction the claimant resides or carries on business or within the local limits of whose jurisdiction the defendant resides, and shall be in such form and contain such particulars as may be prescribed:
4[(3) No application for compensation shall be entertained unless it is made within six months of the occurrence of the accident.]
5[(4) The Claims Tribunal shall treat any report of accidents forwarded to it under 6[section 159] as an application for compensation under this Act.]
7[(5) Notwithstanding anything in this Act or any other law for the time being in force, the right of a person to claim compensation for injury in an accident shall, upon the death of the person injured, survive to his legal representatives, irrespective of whether the cause of death is relatable to or had any nexus with the injury or not.]
बर्याच वेळा ज्या वहना मुळे अपघात झालेला असतो त्याचा विमा, थर्ड पार्टी विमा काढलेला असतो. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची जबदारी ही विमा कंपनीची असते. त्यामुळे वाहनाचा विमा काढणे हे महत्वाचे असते त्यामुळे ते सरकारने सक्तीचे देखील केलेले आहे व ट्राफिक पोलिस देखील जेव्हा गाडीचे कागदपत्रे तपासतात तेव्हा देखील विमा पण तपासात असतात. त्यामुळे आपण देखील आपल्या वाहनाचा विमा हा काढून ठेवावा.
वाहन विमकृत नसेल तर नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही वाहान चालक मालक यावर येते. त्यामुळे वाहनाचा विमा हा महत्वाचा आहे.
त्यानंतर सामनेवला यांना कोर्टा कडून नोटीस जाते ते हजर होतात. त्यानंतर ते त्यांचे म्हणणे (Say) कोर्टात दाखल करतात.
त्यानंतर कोर्ट वकिलांचा युक्तिवाद, दाखल पुरावा, केस चे facts यावरून निर्णय देते.
.
नुकसान भरपाई ची रक्कम जखमी किवा जो व्यक्ती मृत झालेला आहे त्याच्या नातेवाईकांना मिळते.
जर व्यक्ती जखमी झालेला असेल तर त्याला उपचार करण्यासाठी झालेला खर्च, त्याला दवाखायत येण्या जाण्याचं खर्च, औषध पाण्याचा खर्च, त्याचा Attendant ठेवले बाबतचा खर्च, तो किती दिवस रुग्णालयात दाखल होता त्यानुसार खर्च, तसेच झालेली नुकसानभरपाई ची रक्कम मिळते. जखमी व्यक्ती कामावर जाऊ न शकला त्या नुकसानभरपाई ची सुद्धा मागणी करता येते. त्यामुळे उपचाराचे बिले देखील सांबाळून ठेवावीत.
नुकसान भरपाई ची रक्कम मृत व्यक्ती काय काम करत होता. तो वर्षाला किती पैसे कमावत होता. त्याचे वय काय होते. मृत व्यक्ती वर किती लोक अवलंबून आहेत. दवाखान्याला किती खर्च झाला अंतिम संस्कार चा खर्च. मृत कमवित असलेल्या खर्चा मधून त्याचा स्वत: चा खर्च वजा करून कुटुंबाला किती खर्च लागत होत. या सर्व गोष्टी नुसार नुकसान भरपाईची रक्कम ठावली जाते.
अशा प्रकारे अपघात ग्रस्थास किवा त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळाल्याने जखमी किवा मयत याच्या कुटुंबीयांना नक्कीच मदत होत असते.